Monday 25 April 2011

पण त्याचे काय?

मी आज कर्जत ला गेलो होतो. म्हणतात  प्रवासात पंडित मैत्री होते पण मला वाटते कि मानवी स्वभावाची विविध वैशिष्ट्ये, एकाच वेळी क्वचितच कुठे सापडत असतील. असेच दोन  अनुभव मला आज आले . कदाचित योगा  योग असेल.
             मी सकाळी कल्याण स्टेशन वर होतो. प्लेटफोर्म नंबर ४ वर टोकाला उभा होतो. कोयना एक्स्प्रेस आली. सर्वजण घाई घाईत चढत होते. माझ्या समोर जनरल डब्बा होता. गाडी सुटायची वेळ झाली होती.तेव्हा लांबून एक कुटुंब घाईने येत होते. त्यामध्ये एक म्हातारा, एक स्त्री व एक मुलगा होता. गाडी ने भोंगा वाजवून सुटण्याचा इशारा दिला. लोकांनी म्हातारा माणूस पाहून गार्ड ला थोडे थांबण्याची विनंती केली. गार्ड ने त्यांच्या कडे पहिले व म्हणाला कि नाही थांबू शकत. असे सगळ्यासाठी थांबलो तर गाडी लेट होईल. गाडी सुरु झाली. ते कुटुंब डब्या जवळ आले. गाडी सुरु असतानाच ती स्त्री आत चढली. नंतर तिने व मुलाने त्या म्हातारया गृहस्था ला वर चढवू लागले. गाडी ने वेग पकडला होता. म्हातारा गृहस्थ जवळ जवळ पडणारच होता. पण मुलाने सावरले. व तिघे जण चढले एकदाचे . सर्व पब्लिक खाली ओरडत  होती. काही जण म्हणत होते कि हि अशी लोकं वेळेवर येत नाहीत. मग धडपडतात, पडतात किंवा मरतात आणि गाडी लेट होते.  मी मनात म्हणालो कि त्या गार्ड ने गाडी थोडा वेळ थांबविली असती तर.?....
             दुपारी मी कर्जत वरून कल्याणला यायला निघालो. स्टेशन वर उभा होतो. लोकल यायला वेळ होता.  इतक्यात vishakha pattanam एक्स्प्रेस आली. थांबली व वेळेनुसार निघाली. गाडी निघाली व लगेच थांबली. थोडा वेळ गेला. लोकांना वाटले सिग्नल लागला असेल. पण अशीच दहा मिनिटे गेली . मग कुणीतरी म्हणाले एसी डब्यातील लोकांनी चैन खेचली आहे . मी जिथे घोळका दिसत होता तिथे गेलो. तिथे एक अर्धी प्यांट घातलेला गुजराती रेल्वे कर्मच्यारांशी वाद घालत होता. थोड्या वेळाने कळले कि त्यांच्या गाडीतील अर्धा एसी बंद होता. रेल्वे कर्मचारी सांगत होते कि लोणावळ्याला एसी मेक्यानिक आहे तो दुरुस्त करेल. पण डब्यातील लोकं ऐकायला तयार नव्हती. म्हणत होती. त्या मेक्यानिकला इथे बोलवा. जो पर्यंत एसी ठीक होणार नाही तो पर्यंत गाडी पुढे जावू देणार नाही. शेवटी स्टेशन मास्तर आले. त्यांनी माफी मागितली. तर हि गुजराती मंडळी म्हणाली नाही, आम्हाला तसे लिहून द्या.शेवटी स्टेशन मास्तरांनी लिहून दिले व गाडी सुटली.गाडी पस्तीस मिनिटे लेट झाली होती. गाडी गेल्यावर खालची लोकं म्हणू लागली बरोबर होते त्या लोकांचे. इतके पैसे देऊन एसी नाही चालू तर काय उपयोग. मी आपला मनात म्हणालो पण गाडी लेट झाली त्याचे काय?.........
    मी सोबत वरील प्रसंगाचा video  जोडला आहे

No comments:

Post a Comment