Monday 11 April 2011

अश्या एक एक वल्ली

मला रोजच्या प्रवासात काही न काही  नेहमी वाचण्यासाठी लागतेच. आज मी शिरीष कणेकरांचे "सूरपारंब्या" वाचत होतो. त्यातील एक किस्सा . लोक किती विक्षिप्त असतात त्याचा नमुना. त्यांच्याच  शब्दात.
".......माझे एक परांजपे नावाचे एक मित्र आहेत. त्यांचा एका मित्राला शिस्तीचे भारी वेड. रोज सकाळी ऑफिसला जाताना ते बायकोकडे जेवण्याच्या मेनुची लिस्ट द्यायचे. त्यांना जेवताना सर्व पदार्थ लिस्ट प्रमाणे हवे असायचे. एखादा पदार्थ नसेल तर ते सकाळीच सांगायचे. मग ते पर्यायी पदार्थ सुचवीत.उदा. लिंबाचे लोणचे सांगितले आणि नसेल तर ते आंब्याचे सांगायचे. पण एकदा लिस्ट फायनल झाली म्हणजे झाली. जेवताना ते लिस्ट घेवून एका एका पदार्था वर टिक करायचे.  जर पदार्थ लिस्ट प्रमाणे नसेल तर ते पानावरून उठायचे.
         एकदा ते जेवताना फारच अस्वस्थ दिसत होते. बायको काळजीत पडली. पदार्थ तर लिस्ट प्रमाणे सर्व होते. नंतर थोड्या वेळाने ते बायकोला म्हणाले" तुझ्या ताटातले केळे घेवू का ?. " बायको म्हणाली, " घ्या ना. विचारायचे  ते काय ?".  त्यांनी आनंदाने केळे घेतले.
      दुसऱ्या दिवशी त्यांनी लिस्ट मध्ये केळे टाकले होते. बायकोला वाटले स्वारीची  केळे खायची इच्छा दिसते.  दुपारी स्वारी जेवायला बसली. ताटातले केळे उचलले. बायकोला दिले व म्हणाले." कालचे घेतलेले केळे परत."
            पुढे त्या नवरा बायकोचे काय झाले माहित नाही. बहुधा बायकोने नवऱ्यावर   भाडोत्री मारेकरी घातले असतील .

No comments:

Post a Comment