Monday 25 July 2011

दृष्टीकोन

मी रविवारी ठाण्याला गेलो होतो. निघताना दुपार झाली. ठाणे स्टेशनवर आलो . सर्व स्लो ट्रेन लागल्या होत्या. इतक्यात घोषणा झाली कि गोरखपूर एक्स्प्रेस येतेय. म्हंटल जावूया विदाऊट एक्स्प्रेसने लवकर पोहचू. सहा नंबर वर आलो. जाणारे बहुतेक  उत्तरभारतीय होते . गाडी आली . गाडीला गर्दी होती. मी जनरल डब्या जवळ गेलो. पहिले तर दरवाजा आतून लावलेला होता. मी व एक उत्तर भारतीय बाहेरून आतील लोकांना दरवाजा उघडण्यासाठी ओरडू लागलो. दरवाजा उघडत नाही असे पाहून गर्दी पुढच्या दरवाजावर गेली. मी व तो उत्तर भारतीय तसेच थांबून दरवाजा उघडण्याची वाट पाहत होतो. इतक्यात कोणीतरी दरवाजा उघडला. आम्ही पटकन आत गेलो. आत जाताच त्या उत्तर भारतीयाने पटकन आतून दर लावून घेतले. व म्हणाला " साले अंदर आयेंगे तो जगह  नाही होगी". थोड्या वेळापूर्वी आम्ही दरवाजा उघडण्यासाठी आटापिटा करत होतो. आत येताच मात्र आम्ही आतले झालो होतो. जागा बदलली कि दृष्टीकोन लगेच बदलतो.
मी एकदा व्यवस्थापनाच्या  व्याख्यानाला गेलो होतो. त्यावेळी एक गोष्ट सांगितली होती. एका बेकरीत एक कामगार होता. तो नेहमी आपल्या मालकाला नावे ठेवायचा. म्हणायचं कि आपला मालक आपल्याला योग्य मोबदला देत नाही. मालकाच्या  ते  कानावर  गेले  हा सर्व कामगारांना भडकावत आहे.  त्याने त्याला बोलावले आणि सरळ  वरच्या जागेवर बढती दिली. बढती मिळताच त्याने प्रथम इतर  कामगारांचे पगार कमी केले व कारण दिले कि हे कामगार काम न करताच फक्त गप्पा गोष्टी करतात. जागा बदलाच दृष्टीकोन बदलतो. काय !!!!