Tuesday 3 May 2011

विरोधाभास

आत्महत्या खून आजकाल खूप सामान्य गोष्टी झाल्या आहेत.एखाद्याचा मृत्यू झाला म्हणजे विशेष गोष्ट राहिली नाही.
        माझ्या मित्राचे एक मित्र रेल्वे मध्ये vigillance ऑफिसर आहेत. त्यांच्या घरी एकदा गेलो होतो. ते टीसी बद्दल एक एक किस्से सांगत होते. ते म्हणाले कि टीसी आजकाल खूप भ्रष्ट झाले आहेत. आज जनरल डब्यात लोकांना दोघांचा  खूप त्रास होतो, हिजड्यांचा आणि टीसी चा. हि तुलना खरे म्हणजे खूप बोलकी आहे.  सांगता सांगता त्यांनी सांगितले कि मागच्या महिन्यात एका टीसी ला पंधरा लाखाच्या हेराफेरी बद्दल पकडले. तर त्या टीसी ने आत्महत्या केली.  माझा मित्र म्हणाला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. त्याच्या आत्महत्येचे आम्हाला विशेष काही वाटले नाही. चोर होता साला.!!!!.मी म्हणालो फक्त पंधरा लाखाबद्दल आत्महत्या. माझ्या लेखी पंधरा लाख हि हेराफेरीची खूप कमी किंमत होती. thanks to our corrupt ministers !!!.
       तेव्हा ते म्हणाले तो टीसी एका महिन्या नंतर रिटायर होणार होता. त्याला vigillance  ने पकडल्यामुळे त्याचे सर्व फंड, पगार थांबवले जाणार होते. जवळपास तीस लाखाचे नुकसान होणार होते. आता त्याने आत्महत्या केल्यामुळे ते सर्व पैसे रेल्वेला त्याच्या मुलांना देणे भाग होते. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्याने आत्महत्या केली. आता मात्र आम्ही अंतर्मुख झालो. आत्महत्या करणे.जीव देणे म्हणजे काय यातील भयानकता आम्हाला जाणवली. अक्षरश: आपले आयुष्ये संपवणे म्हणजे किती टोकाची भूमिका आहे. आपल्या लोकांच्या भावनाच बोथट झाल्या आहेत. त्या टीसी ने आपले सर्वस्व आपल्या मुलासाठी पणाला लावले. आम्हाला त्याचा त्याग खूप महान वाटायला लागला. थोड्याच वेळापूर्वी त्याचा मृत्यू तुच्छ वाटत होता. खरच किती विरोधाभास आहे.